साहिल खान
तालुका प्रतिनिधी लोणार
लोणार : परतीच्या पाऊसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालेले आहे. अंजनी खुर्द महसूल मंडळ मध्ये दिनांक १६/१०/२०२२ रोजी अचानक ढगफुटी होऊन अतिवृष्टी होऊन काढणीला आलेले सोयाबीनच्या शेतात सर्वत्र पाणी पसरल्याने सोयाबीन पाण्याखाली गेल्याने सडून गेली आहे.५० मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊन सुद्धा ३३ मिमी पाऊस दाखवण्यात आला होता.त्यामुळे अंजनी खुर्द महसूल मंडळ हे शासकीय आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये म्हणून आज मा.मुख्यमंत्री साहेब यांना तहसिलदार लोणार यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. शेजारील सुलतानपूर महसूल मंडळ असून ते अतिवृष्टी मध्ये बसले.त्यामधील भानापूर शिवारातील शेतकरी यांची शेती व अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील अंजनी खुर्द शिवारातील शेतकरी यांच्या सीमा एकमेकांना लागून आहे.सुलतानपूर शिवार हे अतिवृष्टी बसते मग अंजनी खुर्द महसूल मंडळ का बसत नाही.पाऊस तर दोन्ही मंडळ मध्ये सारखाच झाला असून अंजनी खुर्द मंडळ अतिवृष्टी मध्ये बसवून दिवाळी पूर्वी शेतकरी बांधवाना शासकीय आर्थिक मदत मिळावी, अन्यथा सर्व शेतकरी बांधवाना घेऊन तहसिल कार्यालय लोणार समोर आमरण करण्यात येईल असा इशारा अक्षय गायकवाड,उध्दव नागरे,संतोष घुले, सुदाम चव्हाण,रामेश्वर घुले,राजू इंगळे,रमेश भागडे,अमोल अवसरमोल यांनी दिला आहे.सोबत चांदभाई हे सुद्धा उपस्थित होते.