सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
लोणार : भगवान बाबा मित्र मंडळ मालेगाव ता.हिगोली दि.4 ऑगस्ट रोजी मंडळाच्या वतीने अँड.शिवशंकर आघाव सत्कार करण्यात आला व गणेश मंडळ मार्गदर्शन करताना त्यांनी लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या काळामध्ये समाजामध्ये एकजूट निर्माण होण्यासाठी त्यांचे मध्ये संघटन एक नवचेतन्य निर्माण व्हावे ,राष्ट्र भावना ,राष्ट्र निर्मिती व्हावी ,यासाठी गणेश उत्सव सामाजिक रित्या साजरा व्हावा. अशी इच्छा लोकमान्य टिळकांनी केली होती. नव तरुणांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळक यांच्या विचाराचा सामाजिक गणेशोत्सव सामाजिक स्वरूपात साजरा करावा. गणेश मंडळाला मार्गदर्शन करताना अँड.आघाव यांनी व्यक्त केले.यावेळी अँड.एस एस आघाव व माऊली शेठ थोरवे व उद्धवराव थोरवे गुलाबराव थोरवे, माधवराव थोरवे, जनार्दन थोरवे, वैभव थोरवे, दत्ता थोरवे, आकाश थोरवे, सुरेश थोरवे, बालाजी थोरवे, हनुमान थोरवे, भागवत थोरवे, सुनील शिक्षक थोरवे सर्व भगवान बाबा मित्र मंडळाचे मान्यवर उपस्थित होत.