शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या खरडून..
सतिश मवाळ
प्रतिनिधी
काल सायंकाळच्या मुसळधार पाऊस झाला मुळे चिखली तालुक्यातील आमखेड जिल्हा परिषद चे सिंचन तलाव (धरण )फुटल्याने भोगावती नदीला महापूर पूर आल्याने साखर खेर्डा लव्हाळा
मार्गावरील कोराडी नदीच्या
पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती .
हे पाणी कोराडी प्रकल्पात सदर चे पाणी आल्याने अणेक गावांना पाणीपुरवठा करणारा कोराडी प्रकल्प शंभर टक्के तुडुंब भरून स्वयं चलित गोडबोले गेट उघडल्याने सांडव्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले
गजरखेड सवडद नदीलगतच्या जमीन मध्ये पाचशे मिटर पर्यंत पाणी गेल्यामुळे
नदीकाठची अंकूरलेली पिके भुईसपाट होऊन शेकडो हेक्टर वरील पीकाचे व जमिनी खरडल्या गेल्या जमिनी चे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.
मागिल वर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे उत्पादन घटले .कोरोणा मांसाहारी मुळे हतबल झाला आहे.
मुसळधार पावसामुळे पिकांचे व जमीनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.