वरुणराजा रुसला, शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर
तालुक्यात 5 टक्के पेरणी तर 95 टक्के पेरणी पावसा अभावी रखडल्या !
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर:: अकोला गत दहा वर्षापासून सतत अवेळी व अपुरा पाऊस झाल्याने नापिकीमुळे शेतकरी कमालीचा धास्तावलेल्या अवस्थेत आर्थिक संकटात असताना या वर्षी तरी बर्यापैकी पाऊस होऊन बळीराजाची आर्थिक घडी सुधारेल या आशेवर शेतकरयांनी आर्थीक जुळवाजुळव करून, बि.बियाने,खते मशागत खर्च करून बहुतांश शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने आपल्या शेतीत पेरणी केली,पिके अंकुरली असतांनाच उमदीच्या काळात गत काही दिवसांपासून वरुणराजाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजत, शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याचे चित्र आहे, दरम्यान अकोला तालुक्यात अल्प प्रमाणात बहुतांश पेरणी झाल्या असून आपल्या पिकांना जीवदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून वरुन राजाला साकडे घातले तर पावसाने दंडी मारल्याने तालुक्यातील पेरण्या रखडल्याचे चित्र आहे