मा.दिलीपबाबु इंगोले
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर (दि.३० डिसेंबर – २०२१)- स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधान सभेचे जेष्ठ सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा १२३ वा जयंती महोत्सव ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून दि.२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत उत्साहात संपन्न झाला त्या समारंभाच्या समारोपीय तथा प्रमाणपत्र वितरण व आवार भिंतीचे अनावरण, विद्यार्थी भांडार गृहाच्या उद्घाटकीय समारंभाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हनुन बोलतांना कोषाध्यक्ष,श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती पातुर दिलीपराव इंगोले यांनी वरील प्रतिपादन केले.
याप्रसंगी विचार मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणुन किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच चे माजी विद्यार्थी माजी प्रा.विश्वनाथ कांबळे, श्रीमती आर.डी.जी महाविद्यालय,अकोला,अशोकसिंह रघुवंशी, सदस्य, महाविद्यालय विकास समीती, तथाश्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, गुलाबराव पाटील ताले, सदस्य,महाविद्यालय विकास समीती, तथा श्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, कृषीभूषण दादाराव देशमुख, सदस्य, महाविद्यालय विकास समीती, तथा श्री. शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य,विलासराव हरणे, सदस्य, शाळा समिती श्री शिवाजी हायस्कूल, अकोला, विनायकराव पुंडकर श्री.शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, अशोकराव देशमुख श्री.शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, डॅा.के.व्ही देशमुख,महाजन, जयसिंग राठोड, प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आवार भिंतीचे अनावरण आणि विद्यार्थी भांडार गृहाचे उद्घाटन झाले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले.त्यांनतर महाविद्यालायाच्या संगीत विभागाच्या वतीने प्रा. मंगेश राऊत आणि संच यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा किरण खंडारे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गेल्या ९ महिण्याच्या प्रगतीचा आढावा आणि भविष्यकालीन योजना मांडल्या त्याच बरोबर कार्यकारीणी चे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्यामुळे महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होतो आहे. असे उद्गार याप्रसंगी काढले.पुढे बोलतांना मा दिलीपबाबू इंगोले म्हणाले की,भाऊसाहेबांनी जातीधर्माच्या पलीकडे जावुन कार्य केले म्हनुन ते जनसामान्यांच्या मनात आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची साथ नेहमीचं सोबत ठेवुन भाऊसाहेब वाटचाल करीत होते.
काही माणसं एकट्यानं मोठी होतात, काही माणसांना समाज मोठं करतो, तर काही माणसांमुळं समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो ते नाव म्हणजे शिक्षणमहर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होय.
इथल्या शेतकर्यांच्या दैन्यावस्थेला नेमकेपणाने ओळखून त्यांचा स्तर सर्वार्थाने उंचावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आणि विवेकवादी दृष्टिकोनातून विचार करणारे समाजसुधारक म्हणून आजची पिढी भाऊसाहेबांकडे अतीव श्रद्घेनं आणि आदराने पाहते हेचं कर्तुत्व आजच्या पिढीला समोर न्यावयाचे आहे.असे प्रतिपादन केले.त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणुन किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्विचं ज्या सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य करुन अपक्ष असतांना देखील आमचा प्रतिनिधी म्हनुन विधान परिषेदेत पाठवले आणि सेवेची संधी दिली अभूतपूर्व असा इतिहास घडविला त्यासर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.आपल्या भावपूर्ण भाषनात ते बरेचंदा भावुक झाले हे विशेष. शिक्षकांसमोर जे वर्तमान प्रश्न आज आहेत ते पूर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन त्यांनी दिले. श्री शिवाजी शिक्षणसंस्थेची वाटचाल दैदिप्यमान होण्यास शुभेच्छा दिल्या.सध्या ची देशाची अवस्था आणि शैक्षणीक प्रश्न बिकट परिस्थती आहे. यासाठी सोबत संघर्ष करणे गरेजेचे आहे.
भाऊसाहेबांनीही शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानले आणि आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव दिले. पश्चिम महाराष्ट्रात ज्या शिवाजी महाराजांची हयात गेली, त्यांचे कार्यकर्तृत्व फुलले, त्या प्रांतात त्यांच्या नावाने एवढे मोठे प्रतिष्ठान कुठे उभे राहिल्याचे दिसत नाही. याचाचं अर्थ भाऊसाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या दिशांची आखणी करताना कुठेही प्रांतभेद वा सीमाभेद ठेवला नाही.उलट त्यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण, त्यांची दुरदृष्टी ओळखूनच आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव बहाल केले, हा भाऊसाहेबांचा द्रष्टेपणा तेवढाच महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन केले.त्यानंतर महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच चे माजी विद्यार्थी माजी प्रा. विश्वनाथ कांबळे यांनी सांगीतले की आजच्या विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब आणि बाबासाहेब यांच्या विचारांची कास धरुन वाटचाल केली पाहीजे हाचं जीवनाचा सक्सेस पासवर्ड आहे. भाऊसाहेबांचे सर्वचं स्तरातील कार्य हे अलौकिक आहे.म्हनुन शिक्षणसंस्थेतुन वैज्ञाणिक दृष्टी असणारे विद्यार्थी घडले पाहीजे हि काळाची गरज आहे.असे प्रतिपादन केले. त्यांनतर श्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य,विलासराव हरणे, सदस्य, शाळा समिती श्री. शिवाजी हायस्कूल,अकोला यांनी आपल्या भाषनात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासाच्या वाटचालीचा आलेख आपल्या भाषणातून मांडला.त्यानंतर जयंतीउत्सवानिमित्त आयोजीत सर्व स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रणामपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा अनिल देशमुख व प्रा.राहुल माहुरे यांनी केले.मुख्य कार्यक्रमाचे संचालन जयंती उत्सवाचे समन्वयक डॅा रोनिल आहाळे यांनी तर आभारप्रदर्शन सह- समन्वयीका डॅा दिपाली घोगरे यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व आजी व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.