सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : तुर पीक हे कोरडवाहु शेतकऱ्यांचे हक्काचे आणि कमी पाऊसमानात येणारे चांगले दाळवर्गीय पीक आहे. गेल्या काही वर्षां पासुन विदर्भ, मराठवाडय़ातील बहुतांश भागात हे पीक उधळुन वाळण्याचे प्रंचड प्रमाण वाढले आहे. याचा विपरीत परिणाम कोरडवाहु व तुर उत्पादक शेतकऱ्यांवर होत आसुन राज्याचा कृषी विभाग, सरकार, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन विभाग, अपत्ती व व्यवस्थापन खाते सर्वच झोपेत आहेत किंवा झोपेचे सोंग घेत असल्याची टिका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे. दाळीची गरज पुर्ण करण्यासाठी सरकार आफ्रिकेतील मोझांबिक देशात तुर पीकवुन तेथुन आयात करून दाळीची गरज पुर्ण करण्यासाठीचा खटाटोप करते पंरतु अतिशय उत्तम व दर्जेदार तुर पीक घेणार्या विदर्भ, मराठवाडय़ातील तुर उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आज अनेक शेतात उभे तुर पीक वाळत आहे. काही शेतात तर भाजीला शेंगा मिळतील अशीही परिस्थिती नाही. हे प्रमाण सातत्याने वाढत आसुन हिच परिस्थिती कायम राहीली व सरकारने असेच दुर्लक्ष केले तर भागातुन तुर पीक संपायला वेळ लागणार नाही. तुर पीक पुर्ण वाढ झाल्यानंतर सुध्दा वाळत आहे. कृषी विभाग, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन विभाग काय करते कळत नाही. शेतकऱ्यांना हया संकटा बाबत कुणीही बोलायला तयार नाही. कृषी विभाग किती क्षेत्रावर व किती टक्के नुकसान झाले बघायला तयार नाही. भूमिपुत्र कडुन राज्याचे कृषी मंत्री मा.ना. दादाभुसे, कृषी सचिव मा. एकनाथ डवले विदर्भ, मराठवाडय़ातील कृषीचे उपसंचालक , पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व सर्व कृषी विज्ञान केंद्रे व संशोधक विभागाला पत्र दिले असल्याचे भूमिपुत्र कडुन सांगण्यात आले. तसेच ज्या- ज्या शेतकऱ्यांच्या तुर पीकांचे नुकसान झाले आसेल त्यांचे सर्व्हे करून पंचनामे करण्यात यावे व शेतकर्यांना मदत मागीतली आहे. या संदर्भात लवकरच हिंगोली जिल्ह्य़ातील पानकनेरगांव येथे भूमिपुत्र कडुन तुर उत्पादक शेतकर्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेतली जाणार आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले आहे.