अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरामध्ये दुबार पेरणीचे संकट यंदाच्या स्थितीमध्ये पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी वर्गाने पेरणीला जोमाने सुरुवात केली आणि जवळपास 90 ते 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या मात्र दोन दिवसांच्या अंतराने कृषी विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले. दोन दिवस आतोनात पाऊस असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकर्यांनी पेरणी करू नये मात्र याला न जुमानता रस्त्याअभावी समोरच्या शेतकऱ्याने जर शेती पेरली तर आपण जायचे कुठून या उद्देशाने बाजूच्या पेरले आणि आपण पण पेरणी करण्यासाठी तयारीला लागा आणि घाई घाई मध्ये पेरणी झाली पण अशातच सोमवार आणि मंगळवार च्या आतोनात पावसामुळे राहिलेल्या शेतकरी वर्ग व पेरणी केलेले शेतकरी वर्ग अशा जवळपास 25-30 टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट वाढत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे महागा मोलाचे बी आणून सोबत खत पेरणीचा खर्च इत्यादी बाबींमुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. मेडशी परिसरात 90 ते 95 टक्के पेरण्या झाल्या मात्र काही प्रमाणत बियाणे बोगस असल्यामुळे निघालेच नाही त्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने पेरणीकरिता बी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे ग्रामीण भागात असा काही मजूरवर्ग आहे ज्याचे रोजचे जीवन हे मोलमजुरी वर आहे आणि त्यासाठी शेती हा मुख्य पर्याय मात्र वाढती मागणी लक्षात घेता तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना तो आज रोजी मोडकळीस आलाय त्यामुळे शासनाच्या वतीने जर काही उपाय योजना संबंधित सर्वच शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध झाल्या तर दबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना त्याचा कुठेतरी फायदा होईल अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.