हिंगोली, दि. 06 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही नाही, तर 02 रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 635 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.


